कै. विजय पांडुरंग काळसेकर, कला फोटो स्टुडीयोचे संस्थापक. फोटोग्राफी व्यवसायातील एक नावाजलेले रत्न
कणकवलीत तेली समाज संघटीत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात कै. बापू डिचोलकर, कै. वसंत आरोलकर व त्यांची पत्नी, श्री. बबन नेरकर, श्री. नंदकुमार आरोलकर व तेलीआळीतील समाज बांधवांना मोलाचे सहकार्य करणारे समाजसंघटक अशी त्यांची ख्याती होती. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९४८ रोजी झाला. बालपणापासूनच त्याना कला-किडा क्षेत्राची आवड होती. शालेय जिवनात उत्तम धावपटू व व्हॉलीबॉल पटू अशी ओळख त्यांनी निर्माण केली.
नागपूर जिल्ह्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. असे असूनही आम्हाला आमच्या संख्या बळाच्या तुलनेत लाभ मिळत नाहीत. जातीनिहाय जनगणनाच झाली नसल्याने शासनाला धोरण ठरविण्यातही अनेक अडचणी जातात. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करावी, अशी आग्रही मागणी तेली समाज बांधवांनी केली. तेली समाजाची वाटचाल, समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, यशोगाथा यासह सांस्कृतिक महत्त्व आदी मुद्यांवर मंथन झाले.
संताजींचा जन्म एका तेली कुटुंबात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. संतांजीच्या आजोबांचे नाव भिवाजी व वडिलांचे नाव विठोजी. विठोजीचा विवाह सुदुंबरे येथील मथाबाई काळे यांच्याशी झाला. संताजीचे वडील विठोजी दिवसभर घरात तेलाचे घाणे घेत. व्यवसाय तेलाचा होता. घाणे घेता घेता विठोबांचे नामःस्मरण करीत व रात्री देवाचे चिंतन करीत. असे संतांजीच्या घरात धार्मिक कार्यक्रम रोज होत. पूजा नामस्मरण व संत तुकरामाचे अभंग रोज म्हटले जात. संताजीही त्यात बालवयातच सहभागी होत असत.
नागपूर : विदर्भ तेली समाज महासंघाची स्थापना २६ नोव्हेंबर १९९४ रोजी झाली. मधुकरराव वाघमारे, विजय बाभुळकर यांच्या प्रयत्नातून हे संघटन उदयास आले. समाजातील कष्टकरी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या हेतूने महासंघ उदयास आला. नागपुरातील महासंघाचे कार्यालय राजे रघुर्जीनगर येथे आहे. महासंघाच्या माध्यमातून संघटनात्मक पद्धतीने शासनदरबारी अनेक विषयांवर लढे उभारण्यात आले.
गंगवाड़ - भीमा कर्मा सेवा समिति गांगीवाड़ा द्वारा समाज की आराध्य देवी संत शिरोमणि कर्मा जयंती महोत्सव के महापर्व पर 23 मार्च को विशाल सामूहिक विवाह सम्मेलन चतुर्थ वर्ष का आयोजन खेड़ापति माता मंदिर के पास किया जा रहा है। 22 मार्च को साहू समाज द्वारा होनहार बच्चों के सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा एवं उसी दिन राष्ट्रीय स्तर के कवियों द्वारा शाम 6 बजे से कवि सम्मेलन का आयोजन किया जाएगा।