सांगली - स्मशानभूमी, समाज मंदिर यासह तेली समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा तेली समाज महासंघाच्यावतीने रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे करण्यात आली. तेली समाज महासंघाचे युवा सदस्य विजय संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी क्षीरसागर यांची मुंबईत भेट घेतली. त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने जिल्हा तेली समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सांगली : तेली समाजाच्या विविध समस्यांबाबत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा तेली समाज महासंघातर्फे बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय तेली समाजाचे युव सदस्य विजय संकपाळ यांनी बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. समाजाच्या स्मशानभूमीपासून समाजमंदिरापर्यंत विविध प्रश्नांबाबत शासनपातळीवर सोडवणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सांगली : कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यास समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. समाजाचा पारंपरिक व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असताना स्वयंरोजगार मिळवून तरुणांनी स्वावलंबी होण्याची गरज आहे, असे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले.
पाल्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही पालकांची जबाबदारी आ.अमरीशभाई पटेल, शिरपुरात तैलिक समाजातर्फे गुणगौरव
शिरपूर मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळवून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यात अपयश आल्यास येत्या पिढ्यांचे नुकसान होईल हे लक्षात घ्यावे. सर्व सोयीसुविधायुक्त शिक्षण घेवूनच येणारी पिढी स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे. या पिढीतूनच देशाचे व समाजाचे कल्याण होवू शकेल. आपल्या गरजा कमी करा, अनावश्यक खर्च, हौसमौजेला मुरड घाला पण पाल्याना सर्वसोयीयुक्त शिक्षण द्या असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले.
तेली समाजातील उपवर वधु-वरांचे पालकांसाठी बोरीवली येथील वधुवर मेळावा ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात. तेली समाज हितवर्धक मंडळ, बोरीवली आणि कोकणस्नेही ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्तिक विद्यमाने रविवार दिनांक २४/११/२०१९ रोजी सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत ८ वा आगळावेगळा वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.