तेली समाजातील महान विभुती (भाग 3) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
खान्देशातील शेंदुर्णी येथे नाटूबाई आणि मुरडाजीबाबा या दांपत्याच्या पोटी कडोबा हे एकविसावे पुत्ररत्न जन्मले. बोलता यायला लागल्यापासून या मुलाने नाम जपायला सुरूवात केली. थोडा मोठा झाल्यावर कोणत्याच कामात त्याचं लक्ष नसे. कधी कधी करडई न घालताच तासनतास रिकामा घाणा चालविला जाई आणि अकारण बैलाला त्रास दिल्याबद्दल बोलणी खावी लागत. एके दिवशी असाच रिकामा घाणा चालताना पाहून मुरडाजींनी त्यांना भरपूर मार दिला.
आहेरा ऐवजी वधू-वर पालकानांं रक्कम देण्याचे आवाहन
औरंगाबाद नववर्षात तेली समाजातील विवाह सोहळ्यात टोपी-टॉवेल आणि आहेर देऊ नये, याऐवजी रक्कम पालकांना द्यावी, असा संकल्प महाराष्ट्र राज्य तेली समाज विभागीय अध्यक्ष कचरू वेळंजकरांनी जाहीर केला. या घोषणेनंतर लगेचच प्रतिसाद मिळाला.
११ जानेवारी वडधा आरमोरी तालुक्यातील वडधा येथे काल १० जानेवारीला एरंडेल तेली समाजाची सभा उत्साहात पार पडली.
यामध्ये ५ एप्रिलला वडधा येथे विवाह मेळावा आयोजित करण्यात आला असून वडधा तेली समाजाच्या मैदानावर सदर मेळावा आयोजित केला जाणार आहे.
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक शासकीय विश्राम गृह येथे आज दि 30/06/2019 रोजी संपन्न झाली या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हापाध्यक्ष राजाभाऊ घोडके,सचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले,संचालक लक्ष्मण निर्मळे,यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याबैठकीत खालील विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली १) 70 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे ठरले
श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 26 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपुर्ण महाराष्ट्रभरातून व्यावसायिक शिक्षण घेणा-या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना बारा लाख रुपये एवढया रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 446 विद्यार्थ्यांना 1 कोटी 20 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.