Sant Santaji Maharaj Jagnade
ज्यांना आपण संत म्हणुन पुजतो. त्या संत संताजींनी जीवापाड जपलेला हा एक संत तुकारामांचा अभंग. या विषयी आज का बोलायचे तर आपले हाय कमांड व आपण आज ब्राह्मणी धर्माकडे फरफटत निघालोत. भुतकाळाला लाथाडून जुनीच पण नवी गुलामगीरी अनंदाने स्विकारत आहोत याबदद्ल हे विचार मांडून फार मोठा बदल जरूर होणार नाही. परंतु प्रकाशाचा चांगला दिवस म्हणुन काळ्या क्रुर अंधार वाटेवर हा काजवा जरूर असेल. कारण दिप स्तंभाचे नाव घेऊन अंधार वाट तुडवत असताना कुठे तरी जाणीव जरूर होणार आहे. कारण हे तुकारामांचे विचार संताजींनी ब्राह्मणी पणाच्या छताडावर नाचुन जपलेत. हा त्याचा वारसा फक्त समोर ठेवणे हे कर्तव्य आहे. म्हणुन हे लेखन.
मा. प्रांतीक तेली महासभा जि. भंडारा यांचे वतीने २६-८-१६ ला दु. १:३० वाजता जिल्हा कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सभा भंडारा जि. अध्यक्ष देवीदासजी लांजेवार यांचे वतीने आयोजित करण्यात आली. या वेळी दिप प्रज्वलीन राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा. कृष्णरावजी हिंगणकर साहेब ,प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ज. सेक्रेटरी मा. रामलालजी गुप्ता साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष युवक आघाडी चे सुखदेव वंजारी व गणमान्य उपस्थीीत होते
रविवार दि. १५ फेब्रुवारी २०१५ - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व समस्त तेली समाज संस्था, मुंबई व उपनगरे च्या वतीने महाचिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले. महा ह्यासाठीच म्हणावयाचे कारण म्हणजे १५००० स्वेकर फुटाचा मंडप तो पण लग्ना सारखा. शंभर फुट लांब भव्य स्टेज व त्यावर श्री संत संताजी महाराजांची आठ फुट भव्य मुर्ती,
आपले सत्तेसाठी विकलेले नेते. हे आपल्या आरक्षणाला धोके ठरले आहेत. हे जसे सत्य आहे. तेवढेच महाराष्ट्राच्या स्थापने पासून सत्तेत व विरोधात हाच मराठा समाज आहे. फुले, शाहू, अंबेडकरांचे नाव सांगून त्यांची समता, स्वातंत्र्य व त्याग आज मलिन केला गेला आहे. प्रथम जाती पाहून तिकीट वाटप व सामदाम, दंड फोडा व झोडा आशा तंत्रांचा वापर करून विजयाची घोडदौड. मते हवीत पण यांच्या विकासाचा मुद्दा येताच या मंडळीनी आपल्या हितासाठी खेडोपाड्यातील गरिब मराठा व ओबीसी यांच्या मध्ये कलगी तुरा आसा सामना लावून गरिब मराठ्यासाठी लढतो हे बुजगावणे उभे केले. ना यांना गरिब मराठ्यांचे प्रेम ना ओबीसी अस्था. कारण घटने नुसार आरक्षण देता येत नाही हे सिद्ध झालेच आहे. पण लढाई जुंपुन तोंडाला पाने पुसण्याचा हा सर्व प्रकार महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूकी दरम्यान सुरू आसतो. मराठा समाजातील काही राजकीय व्यक्ती आमदार खासदार होण्यसाठी मराठा हा मुद्दा घेऊन वाजवत ठेवतात. कारण याच बळावर मराठा सत्तेत जास्त येतो हे गणित मांडले जाते यासाठी ना. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली. कमिटी या देशाच्या संविधानाला बांधील नसते तर बांधील आसतो आयोग म्हणून आयोग कायदेशीर व कमिटी ही दांडगाई.