Sant Santaji Maharaj Jagnade
तेली गल्ली, एप्रिल 2010
पुणे - तिळवण तेली समाज संस्था भवानी पेठ पुणे या संस्थेची निवडणूक डिसेंबर २००८ मध्ये झाली होती. यावेळी परिवर्तन पॅनेलचे १५ जन बहुमताने निवडुन आले. पहिल्या प्रथम श्री. रामदास धोत्रे संस्था अध्यक्ष झाले. त्यांनी पुर्वी ठरल्या प्रमाणे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा समाज विश्वस्ता कडे जमा केला. त्या नंतर १५ सदस्यांच्या मिटींग मध्ये श्री. संजय दत्तात्रय भगत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
एप्रिल 2010, लेखक : श्री. मोहन देशमाने
महिपतीने बाकी काय केले या पेक्षा एक गोष्ट बरी केली. हा एकच धागा शिल्लक राहिला. हा शिल्लकच नसता तर मी इतिहासात पूर्ण पूसून गेलो असतो. आता पुर्ण पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तो करू नये का ? त्या समुहाकडून हिच अपेक्षा होती. कारण ते त्या जातीत जन्मले आणि अहंकारात वाढले. अहंकार जपने हा त्यांच्या जगण्याचा महामार्ग आहे. त्या मार्गाने जे जाणार त्यांनी त्यांचे काम केले.
बालमटाकळी - मुर्ती ही दगडाची असो वा कारागिरांनी बनवलेल्या कोणत्याही धातूची असो तिची विधिवत पूजा करून तिची प्राणप्रतिष्ठा केली जावे म्हणजे तिच्यात प्राणवत रूप प्राप्त होते. त्यामुळे सर्वजण तिच्यापुढे मोठ्या भक्तीभावाने माथा टेकतात म्हणजे तिच्यात सजीव चैतन्य असते हे सर्वजण मानतात परंतु आता सामाजिक सर्व स्तरीय पिछेहाट पाहता समाजात प्राण ओतण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आ. शिवाजीराव चोथे यांनी केले.
तेली गल्ली, एप्रिल 2010
यवतमाळ - विदर्भ तेली समाज महासंघा च्या अनुषंगाने दि. २०/ ३/२००७ दारव्हा येथे आप्पास्वामी मंदीरामध्ये दु. २ वा. तेली समाजाचे चेतना मेळाव्याचे आयोजन केले असता त्याच अनुषंगाने तेली समाजातील युवकांमध्ये नवचैतन्य सामाजिक बांधीलकी, राजकीय, आथर्भक, शैक्षणिक या मुल्याची समाजात प्रत्येक युवकाला जाणीव जागृती व्हावी या करीता विदर्भ तेली महासंघाने तसेच सामाजिक आर्थीक व दुर्बल संकट आपदग्रस्त कुटुंबाना समाजातील युवकांची मदत व्हावी,
पुणे :- कै. दादा भगत समाजाचे अध्यक्ष असताना त्यांनी पुणे महानगर पालिकेत प्रयत्न करून तेली धर्मशाळे जवळच्या पुलाला श्री. संत संताजी जगनाडे पुल असे नामकरण महानगर पालिकेच्या ठरावा द्वारे केले. सदर पुलावर तसार बोर्ड ही लावला गेला परंतु मध्यंतरी पुलावरचा बोर्ड बरेच वर्ष गायब होता.